Saturday, 12 October 2019

सद्यस्थितीतील राजकीय पक्षांपुढील आव्हाने


सद्यस्थितीतील राजकीय पक्षांपुढील आव्हाने निवडणूक म्हटलं की बंडखोरी अन बरच मतांच राजकारण वगैरे गोष्टी आल्याच. आघाडी अन युतीच्या गणितात बांधलेली सर्वच प्रमुख पक्ष यांना प्रत्येकाला सत्तेवर जाऊन बसायच आहे.आव्हाने पार करायची आहेत .कुठल्या मुद्यावर निवडणूक जिंकल्या जातील मतदार नक्की कुणाला कौल देणार कि त्रिशंकु स्थिती निर्माण होणार मनसे भाव खाऊन जाणार की वंचित आघाडी सारं गणित सध्यातरी स्पष्ट नाही .पण लोकसभेचा अन मागील निकाल विचारात घेता कौल भाजप अन युतीलाच आहे.भाजपसमोर पण बरीच आव्हाने उभी आहेत .भाजपलाही विजय तितकासा सोपा नाही.राकॉंच तर मनसे बरोबर मैत्रीपुर्ण लढती होत आहेत. भाजपसमोरील खर आवाहन आहे ते बंडखोर अन मित्र पक्षांची नाराजी.रासप सह सर्वच पक्ष सध्यातरी भाजपवर नाराज आहेत .कारण रासपला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नाही पण याने तोटा तर रासपचाच होईल हे न समजण्या इतके जाणकर साहेब जाणकार आहेत त्यांना ह्या गोष्टी समजतच असतील पण पक्षांच अस्तित्व धोक्यात येणार याच भीतीने जाणकर त्रस्त आहेत .पक्षाच अस्तित्व धोक्यात आलं तर जाणकरांचही अस्तित्व धोक्यात येणार .म्हणूनच सारं मित्र पक्ष भाजपवर नाराज आहेत.अन सेनाही सर्व मित्र पक्षांच्या बाजून बोलतेय कारण त्यांना ही जास्त जागा आणून मुख्यमंत्री पदावर दावा सांगायचा आहे.पण मुख्य मंत्री भाजपचाच होणार यात शंकाच नाही गेल्या वेळेपक्षा भाजप ह्यावेळेला जास्त जागा जिंकणार कारण भाजप १६४ जागा लढवत आहे अन साहजिकच १६४ पैकी भाजप १४५ जागा नक्कीच जिंकेल यात शंकाच नको. आघाडीतही खर आवाहन बंडखोरांसह भाजप अन युती आहे.लोकसभेत पार खच्चीकरण झालेले दोघ पक्ष आता जिंकून सत्तेत याव म्हणून लढत आहेत.पण सत्ता सहजा सहजी मिळेल अस सध्या तरी चित्र दिसत नाही .आरे सारखे विषय उकरुन त्यांना बळ देवून सत्ताधार्यांना कोंडीस पकडण्याचा विरोधकांचा दाव नक्की लोक ओळखून आहेत .लोकसभेतही मुद्दे नव्हते अन आताही मुद्दे विरोधकांकडे नाहीत.शरद पवार म्हणताय अजूनही अभी तो मे जवान हू .असो पण पक्ष अतिदक्षता विभागात आहे त्याला तेथून बाहेर कस आणाल? मनसेच्या बंद पडलेल्या इंजिनाला इंधन पुरवून त्याला तात्पुरता धक्का दिलाय पण हे इंजिन आताही जर फेल झाल तर .ते नक्की विरोधकांची डोकेदूखी होणार पण जर का हे इंजिन सुसाट धावलं तर युतीला महाग पडेल मनसेने किमान १० जागा जरी जिंकल्या तरी ते भाजप सेनेला सत्तेपासून थांबवू शकतात पण जर का एकही जागा नाही आली तर मात्र फायदा भाजपसेनेलाच आहे . मनसे मुळेच झाली तर त्रिशंकू स्थिती होईल अन्यथा भाजप सेनाच सत्तेवर विराजमान होणार हे मात्र नक्की .कोथरुडच उदाहरण घेतलं तर चंद्रकांत पाटलांना ही निवडणूक नक्कीच कठीण जाणार आहे .त्या कॉंग्रेस राकॉंने मनसेच्या किशोर शिंदेना पाठींबा दिलाय अशात ब्राम्हण समाज नाराज आहे .३०% पेक्षा जास्त मत ब्राम्हणांची ह्या मतदार संघात आहेत तेव्हा हा समाज नक्की कुणाला मतदान करतो हा संशोधनाचाच विषय असेल .पण चंद्रकांत पाटलांना उमेदवारी पक्षाने नक्की विचार करुन दिली असणार यात शंकाच नाही .पवार घराण्याच वर्चस्व पुण्यातून कमी करायच असेल तर चंद्रकांत पाटीलच योग्य उमेदवार आहेत . जनता तसी हूशार तर आहेच योग्य उमेदवारालाच मतदान करेल शंका नाही १००% मतदान करा . Virendra Sonawane 8888244883