Wednesday, 7 February 2018

मोदींचा पॅलेस्टीन दौरा

movie

१० फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पॅलेस्टीन येथे जात आहेत.त्यांचा हा दौरा एक ऐतिहासिक दौरा म्हणून ओळखाला जाणार आहे.कारण भारताचे पंतप्रधान पहिल्यांदाच पॅलेस्टीन भेट देणार आहेत.१९४८ इस्राईल स्वातंत्र होण्याच्या अगोदरपासून भारत पॅलेस्टाइनचा पुरस्कर्ता होता. अलीकडील काळात इस्राईल बरोबरच्या संबंधांमुळे पॅलेस्टाइन बरोबरील जुने संबंध कमी झाले आहेत. पण मोदींच्या दौऱ्यामुळे पॅलेस्टीनला भारताचा पारंपरिक पाठिंबा पुन्हा मिळाला आहे.
      मोदी एकदिवशीय दौऱ्यासाठी जॉर्डनमार्गे रामल्ला जाणार आहेत. भारत विविध क्षेत्रात पॅलेस्टीनसह पाच करार करु इच्छित आहे .नरेंद्र मोदी तेथे यासर अराफत मुझीयमला  भेट देणार आहेत. पॅलेस्टीनमध्ये दहशत वादा विरोधी मुद्यांवर मोदी चर्चा करू शकतात.
        जगभरात भारताच्या ताकदीची चर्चा होतांना दिसत आहे. पहिले चीन मानले कि भारत शक्तिशाली होता आहे. अन सुपर पॉवर अमेरिकाही म्हणत आहे कि भारत एक ताकदवर देश झाला आहे. अन भारताबरोबरील मैत्री अमेरिकेच्या हिताची आहे.संयुक्त राष्ट्रातील अमेरिकी राजदूत निकी हॅलेने म्हटले कि "भारताबरोबरील संबंधांनी अमेरिकी राष्ट्रपती खुश आहेत" डोकलामच्या संबंधानंतर चीनने म्हणालाय कि मोदींच्या काळात भारताची राजनैतिक संबंध खूपच प्रभावशाली झाले आहेत. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने ट्विटर खात्यावर हिंदीत ट्विट केले आहे.
 स्वातंत्र्याच्या काळानंतर दुनियाभराच्या ताकदवर देशांना असा वाटत कि भारताबरोबर आपले राजनैतिक संबंध चांगले व्हावेत. अन भारताने आज पर्यंत कुठल्याहि देशांच्या पाठीमागे डोळे झाकून चालायचे स्वीकार केले नाही.अन हि भारताची शानदार कूटनीती आहे. कूटनीती नक्की काय आहे तर ब्रिटनच्या चर्चिल यांनी म्हटले आहे कि"कुणाला म्हणायचं असेल कि तू भाडंमध्ये जा अन त्यानेच म्हणावं हुजूर रस्ता कुठून जातो. हीच तर कूटनीती आहे."
  मागच्या तीन वर्षात मोदींनी इस्राईल आणि पॅलेस्टीन यांच्या संबंधांना प्रभावीपणे हाताळले आहे,परंतु त्यांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये संतुलन राखण्याची गरज आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, शेती, जलसंवर्धन यांसारख्या विषयात भारताला इस्राईलची मदत मिळाली आहे. जुलै मध्ये मोदी पॅलेस्टाइनला जाता इस्राईल दौऱ्यावर गेले होते. त्यांनतर इस्राईल पंतप्रधान न्यत्यानाहू जानेवारी महिन्यात भारतात आले. २०१५ मध्ये ऑकटोबर महिन्यात प्रणव मुखर्जी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर आले होते. भारतचे राष्ट्रपती पहिल्यांदाच पॅलेस्टीनच्या दौऱ्यावर होते. २०१५ मध्ये पॅलेस्टीनने आयोजित केलेल्या ठरावाला भारताने विरोध करत "गाझामध्ये इस्राईलवर होणाऱ्या आक्रमणाची चौकशी करण्याची "मागणी केली. अन त्याच वर्षी इस्राईलच्या समस्यांचे निराकरण करणारे प्रस्ताव मंजूर करून घेतले. भारताने पॅलेस्टीनला १९८८ मध्ये मान्यता दिली. पॅलेस्टाइन चे राष्ट्राध्यक्ष मोहंमद अब्बास यांनी १९९२ साली भारत दौऱ्यावर आले अन भारताला अखंड पाठिंब्याचे आश्वासन दिले. डिसेम्बर मध्ये , पॅलेस्टीनच्या राजदूताने पाकिस्तानच्या हाफिस सय्यद च्या कार्यक्रमाला हजेरी लावली अन भारताने त्याला आक्षेप घेतला. पॅलेस्टाइनच्या लक्षात आल्यावर पॅलेस्टीनने अली यांना राजदूत पदावरून हटवले.
 भारताच्या पॅलेस्टीन अन इस्राईल यांच्या संबंधाचे त्यांच्या गुणवत्तेनुसार मूल्यमापन करणे आवश्यक आहे. आखाती प्रदेश भारतासाठी महत्वपूर्ण आहेत. भारताला आवश्यक असलेल्या एकूण कच्या तेलाच्या ७०% उत्पादन पुरवले जाते. दशलक्ष भारतीय प्रवाशी ह्या क्षेत्रात काम करतात अन भारताला विदेशी चलन यातून खूप मोठ्या प्रमाणवर मिळते. गेल्या तीन वर्षांमध्ये ,सौदी अरेबिया आणि  युएई अत्यंत यशस्वी दौरा करताना मोदींनी पश्चिम आशियायी देशांबरोबर भागीदारी सुरू केली आहे. सौदी अरेबियाने अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात करण्याची योजना आखली आहे.
   मोदी पॅलेस्टाइन रामल्ला येथील पॅलेस्टीन इन्स्टिटयूट ऑफ डिप्लोमासी चे उदघाटन करणार आहेत.हे पॅलेस्टाइनचे राजनैतिक प्रशिक्षणाचे केंद्र आहे.
हि भेट पॅलेस्टाइन आणि इस्राईल यांच्या संबंधातील बळकटीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
movie

No comments:

Post a Comment