Tuesday, 12 March 2019

आयाराम गयारामांची विचारसरणी


आयाराम गयारामांची विचारसरणी 2019 कोण निवडून येईल हे नंतर बघू पण आधी आपण ज्या पक्षाला मतदान करणार आहोत त्या पक्षातील उमेदवाराची आधी माहीती घ्या ? हिंदूत्ववादी आहे का? देशहितसह समाज हिताच काम करणार आहे का?आयाराम असेल तर मुळीच त्याला मतदान करु नये.याविषयी सविस्तर मी सांगणाच आहे. नेता स्वस्वार्थाने पक्ष बदलतो.हे मात्र जग जाहीर आहे.जो कुणी पक्ष बदलतो तो नक्की एका विचारसरणीचा आहे का?तर उत्तर मिळेल मुळीच नाही.तो हिंदूत्व असू शकतो का तर नाही कारण पक्ष बदला की विचार बदलतात मग सेक्युलर वाला हिंदूत्ववादी विचारांचा होईल तर नाही.मग त्याच्यावर विश्वास पण बसणार नाही कारण पुढच्या वेळेला तो पक्ष बदलेल यात शंकाच नाही.आता तुम्ही म्हणणार पक्षांतर कायदा आहे.त्या उमेदवाराला पक्ष सांगेल तसच वागाव लागतं.पण असे उदाहरणही बरीच आहेत की नेते पक्षाच ऐकतात.?हा मात्र संशोधनाचा विषय आहे.निवडणूक पद्धत भारताची नि:पक्षपाती पणे होते मग मध्यंतरी अण्णा हजारे बोलले की उमेदवाराचा फोटो असावा तर अगदी योग्य आहे.चिन्हाने निवडणूक पक्ष पाती होऊच शकत नाही. उमेदवाराला आपण मतदान देतो.मग कुण्या एका नेत्याच्या नावाने मत मागितले जावे हे लोकशाहीला खुपच घातक आहे.देशहितासाठी कोण योग्य तर आताची परीस्थिती मोदींकडे बोट दाखवते आहे.मग फक्त काय मोदींच्याच नावाने किंवा मोदीसमजून उमेदवारांना मतदान करायच का तर मुळीच नाही.उमेदवारही मोदींच्याच बरोबरीचा असावा.मोदींसारखे त्याच्यात गुण असावेत.संघातल्याच बर्याचश्या लोकांना राजकारणात आणण्याची खुप गरज आहे. अन हो मतदारानेही थोड्याश्या चिरीमिरीला बळी न पडता 100 % मतदान करायला हवय.चिरीमिरी घेवून देशाच नुकसान का करावे? आपण सारे सुज्ञ नागरीक आहोत.देशहितासाठी मोदीसह मोदींचा सहयोगीही योग्य निवडावा.जय हिंद जय भारत विरेंद्र सोनवणे ८८८८२४४८८३

पाकीस्तानातील ज्यु ,आजही राहतात का पाकमध्ये?



पाकीस्तानात 19व्या शतकात बेने इस्राईल ज्यु राहत होते.भारत स्वतंत्र होण्याअगोदरच्या काळात यहूद्यांना समानतेची वागणूक होती.भारत स्वतंत्र झाला अन बरेच बेने इस्राईल लोक भारतात येऊ लागले.इतिहास कार शाल्या वेईल च्या मते 1000 हून अधिक ज्यु समुदाय कराचीसह पेशावर,क्वेटा,आणि लाहोर येथे राहत होता.पेशावरला दोन लहान सभास्थानही होती.बरेच यहूदी ब्रिटीशांच्या काळात पाकीस्तानात आले होते.      कराचीच्या मॅगेन शालोम सिनॅगोगचे उद्घाटन 1893 मध्ये करण्यात आले.याची स्थापना सॉलोमन डेविड उमेरडेकर यास कडून झाली होती.सिनॅलॉगच अधिकृत नाव सिनेगॉग स्ट्रिट होत . 1902 मध्ये श्रीमंत ज्यु लोकांनी गरीबांना मदत म्हणून यंग मॅन ज्युज असोसिएशनची स्थापना  केली.1918मध्ये अखिल भारतीय इस्राईल लीग भरवण्यात आली.कराची हे सर्व भारत पाक बेने इस्राईल साठी केंद्र बिंदू बनलं.या व्यतिरीक्त अफगानी ज्युंच प्रार्थनास्थळ पण येथेच होतं.     पाकीस्तानातील इतर अहवालानुसार 1948साली 2500पर्यंत ज्युसमुदाय होता. ह्या समाजाचा कराचीवर एवढा पगडा होता की पहीला यहूदी सभासद म्हणून 1919ते 1939 या काळात तीन वेळा सभासद बनले. 15 ऑगस्टच 1947 रोजीभारताची फाळणी झाली.त्याकाळात ज्यु लोक असुरक्षित अनुभव घूवू लागले.आपण इस्लामी राष्ट्रात राहत आहोत याची चिड येऊ लागली.याकाळात बर्याच पाकीस्तानी लोकांनी त्याच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले केले.दंगलीच्या परीस्थितीत त्यांना पाकीस्तान सोडून कॅनडा युके इस्राईल मध्ये जाव लागलं.350च्या जवळपास ज्यु पाकीस्तानातून बाहेर पडले.1967च्यै सहा दिवसच्या युद्ध काळात हे सारे ज्यु पाकसोडून इतर देशांमध्ये गेले.पाकी स्तानच्या अध्यक्षांनी ज्युंची प्रार्थनास्थळे पाडली.तिथे शॉपिंग मॉल बांधली. पाकीस्तानात दन्युजच्या अहवालानुसार 800 ज्यु पाकीस्तान मतदार आहेत. कराचीत 400 कब्र आहेत.परंतु ते दुर्लक्षित आहेत.सेवा रक्षक ज्यु जो शेवटा होता तो मरण पावला. तेव्हा पासून हे कब्रस्तान दुर्लक्षित आहे. Virendra Sonawane Jalgaon 8888244883